🏃♀ *'अति घाई’ 🏃♀ माणसाला संकटात नेई* *अखेर पुन्हा एकदा कोल्हापूर, सांगली, ठाणे, पुणे शहर, ग्रामिण कोरोना कहरमय झालय*. ही वेळ कुणामुळे आली? का आली? घाई करण्यामुळेचना? घराबाहेर पडाच. भाज्या कुठे मिळताहेत, मांस-मच्छी कुठे मिळते, फळे बघा आहेत का, धक्के देत ठाण्याचा जांभळी नाका व पुण्याची गुलटेकडी गजबजली जात असेल तर ‘कोरोना’ तुमच्या मानगुटीवर बसणारच आहे. लग्न करण्याची घाई, पोरं जन्माला घालण्याची घाई, त्या पोरांना शाळेत घालण्याची घाई, त्यांची करिअर करण्याची घाई, परदेशात धाडण्याची घाई, मोठ्या पॅकेजची घाई, प्रशस्त मोठ्ठं घर-कार खरेदीची घाई, बँक बॅलेन्स वाढविण्याची घाई. ही घाईची परंपरा थोडी तपासून पहा. अख्खी पिढी भरकटल्याचा प्रत्यय येईल. पूर्वी विवाह लवकर व्हायचे. संतती 10 वर्षांनी झाली तरी काही फरक पडत नव्हता.पूर्वी मुलं 5-6 वर्षे मैदानावर - नदी - डोहावर हुंदडायची मग शाळेत प्रवेश घ्यायची. आज बँका दारात, कर्जाची घाई. पूर्वी 80-90 नंतरच मरणाचा विचार. आता मरणाचीही घाई. 22-25 वर्षांची पोरं मोटरसायकल अपघातात मरतात तेव्हा मोटरसायकल घेऊन देणार्या मातापित्यांची कीवच येते. घाई... घाई... आणि घा...